
निकालानंतर १२ दिवसांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथ दिली जाणार आहे. दरम्यान आता राज ठाकरे महायुती सरकारमध्ये सामील होणार का, याबाबत देवेंद्र फडणवीसांना मोठं विधान केलं आहे.




