
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ काश्मीरमधील राजौरी येथे बनवण्यात आलेले स्मारक बलिदान स्तंभ तयार झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी हा स्तंभ जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. ओवैस अहमद यांनी यांनी मंगळवारी दिली. बलिदान स्तंभ १९४७ मधील पाकिस्तानच्या काळ्या कृत्याची आठवण देतो. जेव्हा सीमापार आलेल्या घुसखोरांनी (कबायली) जम्मू काश्मीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी शेकडो महिलांची इज्जत लुटली आणि ३० हजार लोकांचे हत्याकांड केले.








