
हिंदी मालिकांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता अक्षय म्हात्रेने मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आता अक्षयच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. तो लग्नबंधनात अडकला असून त्याच्या लग्नातील फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.







