
त्यानुसारएस.टी.च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाबाहेर १०० पेक्षा जास्त बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. या रेल्वे स्थानकांपासून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत बसद्वारे मोफत वाहतूक करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे, कामावरुन घरी निघालेल्या मुंबई परिसरातील चाकरमान्यांना या बससेवेमुळे सुरक्षितपणे, कोणतीही गैरसोय न होता घरी पोहोचणे शक्य झाले आहे.





