
सोनाली तनपुरे यांनी लिहिले आहे की, या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्यांना त्यांच्या मुलाची शाळा बदलावी लागली. या घटनेचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर असून वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच शाळेने किंवा पालकांनी घेतली असती तर आज असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे.





