जीवनमार्ग: पूर्वजांचे स्मरण हा ध्यानाचाच‎आणखी एक अनोखा प्रयोग‎

0
30
जीवनमार्ग:  पूर्वजांचे स्मरण हा ध्यानाचाच‎आणखी एक अनोखा प्रयोग‎


पं. विजयशंकर मेहता21 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपली चेतना एकटी असते, तेव्हा ध्यान लागते. पण चेतना मायेच्या‎संपर्कात आली, तर आपण गुंतून जातो. रामकथेत पक्षीराज गरुड असेच‎गुंतले होते. युद्धाच्या वेळी त्यांनी श्रीरामांचे बंधन तोडले आणि वाटले की‎मी मोठे काम केले. पण त्यानंतर ते अस्वस्थ झाले. तेव्हा ते देवर्षी नारदांकडे‎गेले आणि आपला संशय व्यक्त केला – “ब्याकुल गयउ देवरिषि पाहीं।‎कहेसि जो संसय निज मन माहीं।।” नारदांनी सांगितले – गरुडा, श्रीरामांची‎माया फार प्रबळ आहे. मलाही या मायेनं अनेकदा नाचवलं आहे. सावध‎व्हा आणि ब्रह्माजींकडे जा. या प्रसंगातून संदेश मिळतो की आपण‎संसारात राहतो, तेव्हा कुठे ना कुठे गुंतागुंत नक्कीच निर्माण होते. त्यातून‎सुटण्याचा उपाय म्हणजे संतांचा सहवास, सत्संग आणि गुरूंचे मार्गदर्शन.‎सध्या पितृ पक्ष पंधरवाडा सुरू आहे. ध्यान करण्याचा आणखी एक सुंदर‎उपाय म्हणजे पूर्वजांचे स्मरण करणे. त्यांच्या निमित्ताने शुभकार्य केल्यास‎मन एकाग्र होते आणि आपण ध्यानाच्या मार्गावर चालू लागतो.‎

  • humarehanuman@gmail.com
  • Facebook:Pt. Vijayshankar Mehta‎



Source link