
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारनं २०२५-२६ च्या रबी हंगामासाठी ६ पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ केली आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळणार असून कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. वाढीव हमीभाव मिळालेल्या पिकांमध्ये गहू, जवस, हरभरा, मसूर, मोहरी आणि केसर यांचा समावेश आहे.







