
Vande Bharat Train – भारतीय रेल्वे पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांना मोठी भेट देणार आहे. पहिली वंदे भारत ट्रेन राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून लोकांना काश्मीरमध्ये प्रवास करून सुंदर दऱ्या-खोऱ्याचा आनंद लुटता येणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवतील. काश्मीरमध्ये धावणारी वंदे भारत देशात सध्या धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांपेक्षा अधिक वैशिष्ट्यसंपन्न असेल.








