
या आंदोलनात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव आणि चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्यामुळे अनेक भागातील शेती उद्धवस्त झाली. कांद्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र सरकार बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे, अशीही खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.




