
एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले यांनी फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. कोश्यारी म्हणाले की, अजित पवार स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आमच्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,”असा टोला कोश्यारी यांनी लगावला आहे.






