
यामुळे लीलाला चक्कर येऊ लागली आणि ती तोल जाऊन पाण्यात पडणार इतक्यात अभिरामने तिला सावरलं. मात्र, लीलाने अभिरामवरच हल्लाबोल केला. ‘तुम्हाला माहित होतं, मी तुमच्या तोलामोलाची नाही. मी तुमच्या घरात येण्याच्या लायकीची नाही. मी तुमच्या घराला सांभाळू शकत नाही. जी मुलगी एक अंगठी सांभाळू शकली नाही, ती एवढं मोठं साम्राज्य कसं काय हाताळेल? याचा जरा तरी विचार करा. सगळे म्हणतात की, लीलाला काहीच येत नाही. लीला चुकाच करत असते. मात्र, लग्नासाठी माझी निवड करून तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. मला तुमच्याशी लग्न करायचंच नव्हतं. तुम्ही रेवतीची मदत केली, म्हणून दिलेलं वचन पाळण्यासाठया लग्नाला तयार झाले, नाही तर मला तुमच्याशी लग्न करण्याची काहीही इच्छा नाही’, असं लीला म्हणते.








